डाॕ.एन.एन.कुंटे यांची प्रशासनाकडे मागणी
वसमत
शहर प्रतिनिधी
मागील दोन वर्षात करोना महामारीमुळे सर्वच सण ,उत्सव तसेच महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते त्यामुळे महामानवाचे आनुयांयी यांचा हिरेमोड होऊन त्यांच्या उत्साहावर विरजन पडले .
यावर्षी शासनाकडुन निर्बंध हाटवले असुन उत्सव ,जयंती साजरी करण्यांस परवानगी दिली आहे त्यामुळे सर्वच समाजबांधवाचा उत्सव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यांचा मानस दिसुन येत आहे .दि.१४ एप्रिल रोजी महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकंर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यांचे उद्देशाने आमच्या सोहळा समिती तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे .
जयंती उत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडुन वेळेचे बंधन घालण्यात आले आहेत त्यामुळे दिलेल्या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडणे शक्य होणार नाही त्यामुळे समाजाचे आर्थिक ,शारिरिक व मानसिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे .त्यातच एप्रिल महिना हा तिव्र ऊन्हाचा व नैसर्गिक दृष्टीने मोठा दिवस असतो त्यातच हवामान खात्याकडुन उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ते तापमान जास्त आसल्यामुळे सुर्यास्तापर्यंत कोणतेही कार्यक्रम घेणे शक्य नाही ,कार्यक्रमस्थळी थंड वातावरण राहावे यासाठी सुर्यास्तानंतरच मैदानावर पाणी टाकुन जमिनीचे तापमान कमी झाल्यानंतर च कार्यक्रम सुरु होत असतो अशा पद्धतीने वातावरणाची गरमी थंड करण्यांचे प्रक्रियेलाच रात्रीचे ८-९ वाजतात व वातावरण थंड झाल्यानंतर कार्यक्रम सुरु करावा लागतो असे केले तरच उष्माघाताचा एखाद्याच्या जिवित्वावर बेतणारा सभांव्य धोका टळु शकतो .
यामुळे शासनाकडुन या तिव्र उन्हाचा तसेच उष्णतेची लाट या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुन जयंती निम्मित्ताने होणारे सास्कृंतीक कार्यक्रम घेण्यासाठी किमान दोन तास वेळ वाढवुन द्यावा जर प्रशासनाने वेळेचे बंधन सामाजिक कार्यक्रमावर लादले व कार्यक्रम घाईघाईने व उष्ण वातावरणात पार पाडुन समाजबांधवाच्या जिवित्वास काही हानी /धोका निर्माण झाल्यास त्यांची सर्वस्वी जिम्मेदारी ही शासनाची राहील .
तरी वरील सर्व बाबींवर विचार करुन दोन तासाचा वेळ वाढुन मिळावा व जर हा सामाजिक हिताचा ,सर्वांच्या अरोग्याच्या हिताचा योग्य विचार न झाल्यास जयंती निमित्ताने आयोजीत केलेले सर्पुर्ण सास्कृंतीक व कार्यक्रम रद्द करुन नाईलाजाने उपोषणला बसावे लागेल यांची नोद घ्यावी असे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर कुंटे यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे