लिटल किंग्ज शाळेत विद्यार्थी पालक सभा व होय विद्यार्थी संसदेचे उद्घाटन.
वसमत
प्रतिनिधि
सध्या देशातील विद्यार्थी आणि पालक आपल्या पाल्यांना स्पर्धेतील घोडा बनवत आहेत, त्यात ज्ञानाचे माध्यम म्हणून मोबाईल आणि टीव्हीकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पालक बघत असून या दोन गोष्टीच विद्यार्थी आणि पालकातील संवाद कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत .
त्यामुळे विद्यार्थी एकलकोंडी आणि मोबाईलच्या प्रचंड वापरामुळे अभ्यासार्थी बनण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्मघातकी बनत आहेत .
io
हा धोका पालकांनी ओळखावा आणि केवळ ज्ञानाचे माध्यम म्हणून या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या मुलांमध्ये रुजवावा केवळ हे दोन माध्यमातून ज्ञानात भर पाडणार नाहीत तर पुस्तके आणि वेगवेगळ्या या स्पर्धा परीक्षेचे ग्रंथच विद्यार्थी जीवनामध्ये दिशा ठरवू शकतात.
त्यामुळे पालकांनी समजून घेतले पाहिजे , विद्यार्थ्यांने पुस्तकातून केलेला अभ्यास मस्तकात शिरत असतो. हा एकमेव मंत्र पालकांनी ध्यानात ठेवावा असे मत अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सरिता पतंगे यांनी व्यक्त केले. त्या वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कूलच्या पालक सभेत मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालयाची तिसरी पालक सभा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती .या निमित्ताने विद्यार्थी संसदेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसमत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री .संदिपान शेळके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरिता पतंगे , पालक प्रतिनिधी कर्जत नगरपरिषद, अहमदनगर येथील कार्यालयीन अधीक्षक आणि शाळेचे पालक श्री .मयूर महाजन हे उपस्थित होते . प्रास्ताविक शाळेचे संस्थापक प्रा.डॉ.नामदेव दळवी यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक सुशील थोरात आणि पिराजी सईम यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी केले. पाहुण्यांचे स्वागत शाळेतील संगीत विभागाचे विभाग प्रमुख सिद्धार्थ खंदारे आणि त्यांच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन केले.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके म्हणाले की सध्या पालकांची स्पर्धा केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर हीच झाली आहे . त्यासाठी पालक वाटेल ते करायला तयार आहे पण आपला विद्यार्थी कोण्या क्षेत्रात स्वतःचे करिअर करू शकतो याचे भान पालकांनी ठेवावे. मुलांवर अपेक्षाचे ओझे लादू नका. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनीयर निर्माण होणार नाही तर क्रीडा, संगीत , नाटक,विज्ञान ,राजकारण , अर्थकारण अशी अनेक क्षेत्रे आज उपलब्ध आहेत हे सुद्धा क्षेत्र निवडली पाहिजे . सद्या सामाजिक परिस्थिती प्रचंड बिघडत आहे. सोशल मीडियामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे ,व्हाट्सअप फेसबुकचे विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या बालमनावर होत आहेत .त्यामुळे शिक्षक शाळेची जबाबदारी वाढली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे ज्ञान शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थिनी निदान माणूस झाला पाहिजे याचे भान पालक , शिक्षक आणि शाळा यांनी ठेवावे असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थी संसदेचे उद्घाटन होऊन शाळेतील सहा विद्यार्थ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. ज्यात कु.प्राजक्ता दळवी विद्यार्थीनी संसद सचिव . कु.अक्षरा रणखांब शालेय शिक्षण मंत्री ,यश उबारे शालेय शिस्त मंत्री, कु.तनिष्क अंकुश शालेय स्वच्छता मंत्री, रुद्राक्ष फुगणार शालेय पर्यावरण मंत्री आणि जुही मेहता शालेय अर्थमंत्री .
या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र वाटप करून मंत्री पदाची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थी संसद सचिव म्हणून कु. प्राजक्ता दळवी हिने शिक्षण, समाज ,अर्थ राजकारण संगीत इत्यादी क्षेत्रात आमची शाळा अव्वल करण्याची शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी त्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन केले.